(Sun Meditation) सुर्याची ध्यान धारणा, रोगमुक्त व यशस्वी जिवनाचे स्त्रोत..

डिजीयुगंधरा (DgYugandhara)
0


DgYugandhara प्रस्तुतः सूर्याला 'अर्घ्य' का वाहतात..?? कोणते वैज्ञानिक व शास्त्रीय कारण आहे यामागे?? तर, हा एक ध्यान धारणेचाच प्रकार आहे.(Sun Meditation ) बोलू. शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यकआहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशानेमानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मासमजले जाते. जीवेत शरदः शतम्‌ (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.

एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारी उब आमच्यात सुरक्षित रहात असेलतर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा संबंध मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिनआहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.

अशा अनेक प्रकारे सूर्यप्रकाश हा, मानवी जीवनात फार महत्त्वाचा घटक आहे. सूर्यप्रकाशा शिवाय कोणत्याही जिवाचे जीवन पूर्ण होऊच शकत नाही. आणि म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये वैज्ञानिक आधारावर सूर्यप्रकाशाचे अनेक प्रकारे महत्त्व सांगितले गेले आहे. त्याचा अनुरुप उपयोग ह्वावा या करीता काही उपाय देखील सुचविले गेले आहेत. त्यातलाच एक उपाय म्हणजे (Sun Meditation) सूर्याचे ध्यान.

रोज पहाटे सुर्याचे ध्यान केल्याने, व्यक्ती निरोगी व शक्तीशाली बनते. सकरात्मक विचारांचे मंडळ तिच्या अवतीभवती निर्माण होते आणि अर्थातच सकरात्मक परिणाम तिच्या जिवनावर होतात. रोज पहाटे सुर्याचे ध्यान केल्याने अनेक रोगांंपासून मुक्तता होते आणि औरा (आभास मंडल) पवित्र व प्रकाशमय होतो. अर्थातच त्या व्यक्तिचे जिवन सकारात्मक बणून, यश त्याचे साथ देते. तो व्यक्ती यशस्वी बनतो. त्यासाठी सुर्याची ध्यान धारणा करणे म्हणजे, तन, मन व स्पिरीट (आत्मा) यांचे एकसांघीक होणे असून, त्याचे योग्य गुरू कडून ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे. हा लेख आपणास कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रिया देऊन कळवा आणि उपरोक्त माहितीच्या समुपदेशना करिता संपर्क करा. DgYugandhara द्वारा प्रसारीत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

If you have any query, please let me know.

एक टिप्पणी भेजें (0)